नवरा आणि बायको या दोघांच नातं विश्वासाच्या नात्यावर त्यांचा संसार हा पूर्णपणे अवलंबून असतो. तो डलमळला की संसार ही शेवटच्या थराला जाऊन पोचतो हे कित्तेक जोडप्यांना माहीत असेल पण तरीही कधी कधी अशा गोष्टी घडतात की काही जण त्याच्यापुढे ही हतबल होतात. पण कधी कधी अशाही काही गोष्टी असतात ज्या केल्याने खरच तुमच्या मधील प्रेम वाढत जाईल. जास्त काही करायची गरज नाही फक्त रोजच्या जीवनात हे थोडेफार बदल करा आणि तुमच्या संसारात एक नवीन उमेद आणा.
पहिली गोष्ट म्हणजे पती आणि पत्नी या दोघांनीही आपल्या जोडीदाराला कसली गरज जास्त हे लक्षात घ्यायला हवं. आपल्या जोडीदाराची गरज भागवायला हवी मग ती गरज कोणत्याही प्रकारची असो फक्त ती तुमच्या आवाक्यात असायला हवी. त्यामुळे तुमचं जोडीदार तुमच्यावर नक्कीच खुश होईल.
जेव्हा पत्नी एकटीच स्वयंपाक घरात काम करत असते तेव्हा आवर्जून तिची मदत करा. तिला विचार माझी मदत हवी का? किंवा लहान सहान मदत करा त्यामुळे ती नक्कीच तुमच्यावर खुश होईल.
दोघांनीही एकमेकांची आवड लक्षात घेऊन जेव्हा कोणतीही मालिका बघत असता तेव्हा जोडीदाराची आवड लक्षात घेऊन ती मालिका बघा. त्यामुळे तुमच्या घरात नेहमी वातावरण आनंदी राहील.
एखादे वेळेस झालेले भांडण आणि त्यावरून एकमेकांवर केले जाणारे आरोप केले जातात. चुकीचे खापर समोरच्यावर फोडले जातात पण कितीही भांडणे झाली तरी जोडीदाराने मग तो नवरा असो किंवा बायको या दोघांनीही विचार करावा. चुकीची जबाबदारी समजून घ्यायला हवी, जे झाले ते झाले त्यासाठी एकमेकांना जबाबदार न धरता या परिस्थितीतून मार्ग कसा काढता येईल हा विचार करावा.
पती आणि पत्नी या दोघांमध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या कधी कधी मनाविरुद्ध घडत असतात पण तरीही त्या स्विकारल्या जातात. पण त्यामुळे मनात राग, चीड उत्पन्न होते आणि तुमचे नाते कमकुवत होते यापेक्षा जे काही आहे ते दोघांनीही एकमेकांशी बोलून घ्यावे. त्यामुळे एकमेकांच्या मनातील भावना समजण्यास सोपे होईल.
जोडीदाराने आपल्या पत्नी किंवा नवऱ्याचा अपमान कोणाही परक्या किंवा घरातील व्यक्तिसमोर करू नये त्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात पती पत्नीला एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला मिळत नसेल तर यावेळी ही समजून घेण्याची गरज दोघांनीही आहे. यासाठी आठवड्यातून असा दिवस वेगळा काढा ज्या दिवशी तुम्हाला एकमेकांसोबत पुरेसा वेळ मिळेल.
सध्या मोबाईलचा जमाना आहे. त्यामुळे आपला नवरा किंवा बायको हे जास्त करून मोबाईल वर आपला वेळ घालवत असतील तर एकमेकांवर संशय घेणे ही गोष्ट आलीच पण संशय घेण्याअगोदर आपण आपल्या जोडीदाराशी विश्वास ठेवावा आणि आपल्या मनातील शंका समजून सांगावी. पण अरेरावी करू नये.
अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या नवरा आणि बायको यांच्यात भांडण निर्माण करत असतात मग ते घरातील सासू सुनेचे भांडण असो किंवा नणंद आणि भावजयचे भांडण पण कितीही भांडलो तरी आपल्याला शेवटी एकत्रच राहायचे असते. त्यामुळे भांडण करतानाही समोरच्याला जास्त दुखावू नये ही गोष्ट दोघांनीही लक्षात घेणे जास्त गरजेचे आहे.