सहसा कंटाळा येतो म्हणून आपण कडधान्य मोड न आणता खातो. पण हे कडधान्य तसेच न खाता मोड आणून खा. यामुळे अनेक घटक जे तुमच्या शरीराला आवश्यक असतात ते मिळतात. मोड आलेल्या हरभऱ्यातून ही असे अनेक घटक मिळतात
यात मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ज्यांना बद्ध कोष्टता हा आजार आहे त्यांनी मोड आलेले हरभरे खा. त्यामुळे तुमचा त्रास नक्कीच कमी होईल.
त्याचप्रमाणे मोड आलेले हरभरे खाल्ल्याने तुमच्या शरीराला एक ऊर्जा मिळते. दिवसभराचे मेहनतीचे काम तुम्ही न थकता करू शकता. तुमच्या थकलेल्या शरीराला शक्ती देण्याचे काम हे मोड आलेले हरभरे देतात.
ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी रोज मोड आलेले हरभरे खाल्ल्याने फायदा मिळतो. शरीरातील रक्तात असणारे साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते.
मोड आलेले हरभरे गुळासोबत खा. त्यामुळे तुमच्या शरीरात असणारी रक्ताची कमतरता भरून निघते. अनेमीया सारख्या आजारावर मोड आलेलं हरभरे आणि गूळ खाणे उत्तम औषध आहे.
मोड आलेले हरभरे खाल्ल्याने तुमच्या मुत्रणलिकेचे असते आजार ही कमी होण्यास मदत होते.
याशिवाय त्वाचेसंबधी आजार ही हे हरभरे खाल्ल्याने कमी होतात.
आरोग्याविषयी हे आर्टिकल सुद्धा वाचा.